Ad will apear here
Next
‘शेतकरी बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे’
शेतकऱ्यांच्या बियाणे सुधार प्रयत्नांना कृषी विद्यापीठांनी सहकार्य करण्याचे आचार्य देवव्रत यांचे आवाहन
नंदुरबार : ‘भारताला व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करावयाचे असेल, तर शेतकरी बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या बियाणे सुधार प्रयत्नांना सहकार्य करावे,’ असे आवाहन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

शेतकऱ्यांकडील पीकजाती आणि बियाण्यांचे जतन, संरक्षण करण्याच्या हेतूने नंदुरबारमध्ये नुकतेच राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राचे, तसेच त्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या बियाणे प्रदर्शनाचे उद्घाटन आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 

या वेळी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, अक्षय कृषी परिवाराचे मनोजभाई सोलंकी, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, राष्ट्रीय ऑथोरिटीचे रजिस्ट्रार जनरल डॉ. अग्रवाल, महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर, डॉ. डांगे यांच्यासह अनेक संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रदर्शनात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांतून संशोधक शेतकऱ्यांनी शेकडो प्रकारचे बियाणे मांडले होते. 

बियाणे हा शेतीचा आत्मा आहे. बियाण्यातील विविधता हा याचा गाभा आहे. ही विविधता आधुनिक काळातील विकास प्रक्रियेने दुर्लक्षित केली गेली. त्यामुळे यावर सामूहीक चिंतन आणि मंथनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ‘शेतकऱ्यांनी पारंपरिक बियाणे सांभाळणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन चर्चासत्राचे आयोजन सचिव डॉ. गजानन डांगे यांनी केले.

चर्चासत्राचे स्वागतपर भाषण राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांनी केले. त्यांनी बियाणे विषयातील विद्यापीठाचे कार्य, तसेच या संबंधातील आगामी दिशा याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय ग्रामविकास प्रमुख डॉ. दिनेशजी यांनी भारतीय कृषी चिंतनांमधील बियाणे विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. या चर्चासत्राकरिता झालेल्या सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले. 

महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विषय हाती घेतल्याबद्दल राष्ट्रीय चर्चासत्र आयोजकांचे अभिनंदन केले आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उद्घाटन सत्रात विस्तृत विचार मांडले. ‘बियाणे प्रयोगशाळेत नव्हे, तर शेतकऱ्यांच्या शेतात सांभाळले गेले पाहिजे. शेतकऱ्यांनी बियाणे स्वतःपुरते न सांभाळता उत्तम बियाण्याचे बीजोत्पादन करावयास हवे आणि ते इतरांनादेखील उपलब्ध करून दिले पाहिजे,’ असे ते म्हणाले. त्यांनी स्वानुभवही सांगितले आणि काही दाखलेही दिले. 

चर्चासत्राची ठळक वैशिष्ट्ये :
या चर्चासत्राला विविध राज्यांतून संशोधक शेतकऱ्यांची, शास्त्रज्ञांची, सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शेकडो बियाण्यांचे प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले होते. या वेळी उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, बीज संग्राहक राहीबाई पोपरे, जैवविविधता केंद्र जतन करणारे रामसिंग वळवी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राष्ट्रगीताद्वारे उद्घाटन सत्राचा समारोप झाला.

(‘सीड मदर’ राहीबाई पोपरे यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/BZRLBW
Similar Posts
विद्यार्थी विकासासाठी दर वर्षी महिन्याचे वेतन देणाऱ्या स्नेहल गुगळे ठरल्या आदर्श शिक्षिका नंदुरबार : ‘विद्यार्थी माझा पांडुरंग आणि शाळा माझी पंढरी...’ असे मानणाऱ्या शिक्षकांची संख्या आजच्या काळात कमी झाली आहे. अशा मोजक्या शिक्षकांपैकी एक असलेल्या स्नेहल गुगळे यांना यंदाचा राज्य सरकारचा आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे. शिक्षक म्हणून वेगवेगळे उपक्रम त्या राबवतातच; पण २००९मध्ये नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शाळा कलमाडी त
ग्रामीण रुग्णालयातील ‘त्या’ डॉक्टरकडून दिवसभरात ४८३ जणांवर उपचार नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव या अतिदुर्गम, आदिवासी भागातील सरकारी रुग्णालयात गेल्या आठवड्यात एक विक्रम झाला. डॉ. संतोष परमार या वैद्यकीय अधिकाऱ्याने वेगवेगळ्या प्रकारच्या व्याधींनी ग्रस्त असलेल्या ४८३ रुग्णांवर एका दिवसात उपचार केले. या रुग्णालयातील अन्य सात डॉक्टरांच्या जागा रिक्त असल्याने
आदिवासी भागातील कबड्डीपटू चुनीलालची गरुडभरारी नंदुरबार : दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या चुनीलाल पावराने कबड्डीतील प्रावीण्याच्या बळावर राष्ट्रीय पातळीवरील प्रो कबड्डी लीगमध्ये निवड होण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याच्या रूपाने देशाला एक प्रतिभावान राष्ट्रीय कबड्डीपटू मिळाला आहे. दुर्गम आदिवासी भागात राहून,अत्यंत प्रतिकूल
सोन्यासारख्या शिक्षकाला सोन्याची अंगठी नंदुरबार : शिक्षक गावाच्या शाळेसाठी आणि गावासाठीही काय करू शकतात आणि त्या कृतज्ञतेपोटी गाव काय करू शकते, हे कल्पनेच्या पलीकडचे असू शकते. नंदुरबारसारख्या आदिवासीबहुल जिल्ह्यातील कलमाडी तर्फ बोरद (ता. शहादा) येथील ग्रामस्थांनी चांगले काम करणाऱ्या शिक्षकाला कृतज्ञतेपोटी १० ग्रॅम सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language